मल्टिकॅपमध्ये गुंतवणूक का ?
सर्वसाधारण गुंतवणूकदारांना कोणत्या फंडात गुंतवणूक करायची याचे ज्ञान नसते. अशा गुंतवणूकदारांसाठी हे फंड चांगले ठरतात. या फंडामुळे गुंतवणूकदाराची गरज व बाजाराची स्थिती लक्षात घेऊन फंड मॅनेजर मल्टिकॅपमधील निधी वेगवेगळ्या कॅपमध्ये वळवू शकतात. उदाहरणार्थ, बदलत्या बाजारानुसार स्मॉल कॅपमधील गुंतवणूक ही अव्यवहार्य ठरल्यास तो निधी लार्ज कॅपमध्ये वळवता येते. किंवा, नेमके याच्या उलटही करता येते. दुसरीकडे, लार्ज कॅपमधील ८० टक्के स्टॉक हा आघाडीच्या १०० कंपन्यांच्या इक्विटीत गुंतवावा लागतो. तर, मिड कॅप फंडमधील ६५ टक्के स्टॉक हा १०१ ते १५० क्रमांकांवरील कंपन्यांच्या इक्विटीत गुंतवावा लागतो. याचा विचार करता मल्टिकॅप फंड हे अधिक लवचीक व सोयीस्कर असतात.
मल्टिकॅपमध्ये गुंतवणूक करावी?
शेअर बाजाराचे सखोल ज्ञान नसणाऱ्या, कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या तसेच, थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करू न इच्छिणाऱ्यांसाठी या योजना चांगल्या ठरतात. अनेक गुंतवणूकदारांना आपल्या गरजेचा अंदाज नसतो. मल्टिकॅपमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही काळाने बाजाराची स्थिती, जोखमीचे प्रमाण व परतावा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार लार्ज, मिड वा स्मॉल कॅपकडे गुंतवणूकदारांना वळता येते. अन्य फंडांच्या तुलनेत मल्टिकॅप हे अधिक लवचीक असल्याने संपत्ती निर्मितीसाठी ते सरस ठरतात. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करू इच्छिणाऱ्यांसाठीही हे फंड उपयुक्त ठरतात. निवृत्तीनंतरची तरतूद तसेच, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी नियोजन आदी आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठीही हे फंड उपयोगी पडतात.
या फंडांचा गुंतवणूक कालावधी किती ?
कोणत्याही इक्विटी गुंतवणुकीप्रमाणे या फंडांतील गुंतवणूक किमान सात ते दहा वर्ष राखणे आवश्यक आहे. यामुळे बाजारातील चढउतारांचा त्यावर परिणाम होत नाही. तसेच, परताव्याची रक्कम वाढतच जाते.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाशी संपर्क साधावा !!