प्राप्तिकर कायद्यात झालेल्या बदलानुसार १ जुलै २०२२ पासून खालील बदल लागू झाले आहेत
* ज्या करदात्यांनी आधार आणि पॅनची जोडणी अद्याप केलेली नाही त्यांना दुप्पट म्हणजे १,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. ३० जून २०२२ पर्यंत तो ५०० रुपये होता.
* मागील अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्यात नव्याने ‘१९४ आर’ हे कलम जोडण्यात आले. हे कलम १ जुलै २०२२ पासून लागू झाले. या कलमानुसार उद्योग-व्यवसायातून किंवा व्यवसायातून उद्भवलेला कोणताही लाभ किंवा अनुलाभ, जो पैशात बदलता येण्याजोगा असो किंवा नसो, असा लाभ किंवा अनुलाभ प्रदान करण्यापूर्वी अशा लाभाच्या किंवा अनुलाभाच्या मूल्याच्या किंवा एकूण मूल्याच्या दहा टक्के दराने उद्गम कर (टीडीएस) कापण्याची तरतूद आहे.
* असे लाभ एका आर्थिक वर्षांत २०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास ही तरतूद लागू होत नाही.
* डॉक्टर आणि सामाजिक माध्यमाद्वारे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती या तरतुदीमुळे प्रभावित होतील. उदाहरणार्थ, औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना मोफत मिळणाऱ्या औषधांच्या नमुन्यांवर (एका वर्षांत २०,००० रुपयांच्या किमतीपेक्षा जास्त असल्यास) उद्गम कर कापला जाईल.
* आभासी चलनावर १ टक्का उद्गम कर (टीडीएस) १ जुलै २०२२ पासून कापला जाईल. आभासी चलनाच्या उत्पन्नावर ३० टक्के सरसकट कराच्या तरतुदी १ एप्रिल २०२२ पासूनच लागू झाल्या आहेत. उद्गम कर मात्र १ जुलै २०२२ पासून कापला जाईल.

अभिप्राय द्या!