मासिक वेतन ५० हजार रुपये असल्यास दहा हजार रुपये घरखर्च वा स्वतःच्या खर्चासाठी वेगळे ठेवून उरलेल्या रकमेची गुंतवणूक व्हायला हवी. याची सुरुवात बँकेमधील रिकरिंगने करावी. हा बचतीचा पारंपरिक पर्याय आहे. यामध्ये आपण विशिष्ट रक्कम निश्चित करून रिकरिंगचा कालावधी ठरवून घ्यायला हवा. यातून आपल्याला एकगठ्ठा गंगाजळी उपलब्ध होईल. त्याचा विनियोग पुन्हा गुंतवणुकीच्या रूपाने करणे आवश्यक आहे. यासाठी भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) याचा विचार करता येईल. समजा महिन्याला पंधरा हजार रुपयांचे रिकरिंग काढले असल्यास यातील एक लाख रुपयांची रक्कम ही तरलतेसाठी (लिक्विडिटी) ठेव म्हणून ठेवता येईल व उरलेली रक्कम पीपीएफमध्ये गुंतविता येईल. पीपीएफ हा करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय आहे. तसेच, याचा उपयोग स्वतःच्या भविष्य निर्वाहासाठीच केला पाहिजे.

सोने-चांदी

सोने व चांदीचा गेल्या दशकभराचा विचार केल्यास यातून फायदाच झाल्याचे दिसते. अर्थात, यासाठी या दोन्हींमध्ये दीर्घकालीन व टप्याटप्प्याने गुंतवणूक करीत राहणे आवश्यक आहे. तसेच, अन्य कोणत्याही पर्यायापेक्षा सोने-चांदी तरलतेचा (लिक्विडिटी) सर्वांत वेगवान पर्याय आहे. तसेच, तो जगमान्य आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या पर्याया यांचा समावेश अत्यंत आवश्यक आहे. स्वतः खर्च व बँकेचे रिकरिंग वजा जाता उरलेल्या रकमेतून महिन्याला पंधरा हजार रुपये सोने-चांदीमध्ये गुंतविण्यास हरकत नाही. सोन्याचा सरासरी एक ग्रॅमचा दर तीन हजार रुपये असल्याचे गृहित धरल्यास महिन्याला पाच ग्रॅम सोने घेता येऊ शकते आणि वर्षअखेरीस साठ ग्रॅम सोने आपल्याकडे जमा होते. असेच पाच वर्षे तीनशे ग्रॅमपर्यंत आपले सोने खरेदी होऊ शकते आणि पंधरा वर्षांचा कालावधी विचारात घेतल्यास नऊशे ग्रॅमपर्यंतही ही गुंतवणूक जाऊ शकते.

म्युच्युअल फंड

सोन्यात गुंतवणूक कमी करायची असल्यास त्याच पंधरा हजार रुपयांचा उपयोग भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यासाठ होतो. यासाठी थेट शेअर खरेदी करण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा पर्याय निवडावा. यातील गुंतवणूक तीन ते पाच वर्षे करत राहावी. यामुळे शेअर बाजारात येणाऱ्या चढ-उतारांपासून सरासरी गाठता येते. पण, यामध्ये तरला असली तरी शेअर बाजारातील थेट वा अप्रत्यक्ष गुंतवणूक जोखमीची आहे. आपल्याला गरज भासल्यास पैसे लगेचच मिळतात. मात्र, मिळणारी रक्कम ही बाजारातील तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असते. अर्थात, जो जोखीम घेतो त्याला त्याचे फळही चांगले मिळू शकते, हे विसरून चालणार नाही.

कर्ज घ्यावे ?

आपल्याकडे पुरेसा पैसे नसल्याने एखादी वस्तू घेण्यासाठी आपण कर्जाऊ रक्कम काढतो. पण, कर्ज कशासाठी काढतो, हे महत्त्वाचे आहे. कार ही मालमत्ता नाही, त्याचे मूल्य दरवर्षी घटते व अखेरीस शून्य (कागदोपत्री) होते. त्यामुळे कारसाठी कर्जाचे प्रमाण हे मूल्याच्या वीस ते तीस टक्क्यांपेक्षा अधिक, असू नये. फ्लॅटसाठी काढलेले कर्ज हे मालमत्तेमध्ये येते. स्थावर मालमत्ता क्षेत्रात मंदी असली तरी मालमत्तेचे मूल्य अजूनपर्यंतरी नकारात्मक कधीच झालेले नाही. त्यामुळे घरासाठी कर्ज काढलेले वाया जात नाही. पण, मुदतीच्या आधी लवकरात लवकर कर्ज कसे फेडता येईल, याचा विचार नक्कीच करायला हवा.

टर्म इन्शुरन्स

रिककिंगमधून शिल्लक राहिल्या रकमेतून इन्शुरन्सचा टर्म प्लॅन काढावा. तिशीच्या आत व निर्व्यसनी असल्याला व्यक्तीस कमी प्रीमियममध्ये मोठे इन्शुरन्स कव्हरेज मिळते.

अशा पद्धतित नियोजन केल्यास आर्थिक targets सहजच हाति येतात !! तथापि सल्ला हा घ्यावाच !!

अभिप्राय द्या!