खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एखादी कंपनी वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कपात करूनही तो वेळेत जमा करीत नसेल तर, त्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना समजू शकणार आहे. निधी भरण्यात अनियमितता झाल्यास ही माहिती आता दस्तुरखुद्द सरकारकडूनच ई-मेल किंवा एसएमएसद्वारे समजणार आहे. या माध्यमातून आधीच्या महिन्यात जमा न झालेल्या निधीची माहिती प्राप्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून घेतलेली रक्कम परस्पर हडप करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश लागणार आहे.

अभिप्राय द्या!