निवृत्तजीवनाचे नियोजन–
सेवानिवृत्त जीवनांत १५ वर्षे लोटलेले श्री देशपांडे यांना सतावणारा मुद्दा काय? तर निवृत्तीपश्चात मिळालेला पैसा त्यांनी एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविला होता. त्यामधून मिळणारी रक्कम स्थिर असली तरी १५ वर्षांपूर्वी पुरेशी वाटणारी रक्कम आता अपुरी पडायला लागली होती. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना खात्री होती की त्यांच्या निवृत्तीपश्चात मिळालेल्या पैशातून ते समाधानाने आयुष्य जगू शकतील. परंतु व्याजदर इतक्या झपाटय़ाने कमी होतील अशी कल्पना नसल्याने त्यांना आता खर्चाचा मेळ घालणे अशक्य झाले होते. देशपांडेयांचे नेमके काय चुकले आणि त्यांच्यासारख्या चुका न व्हाव्यात यासाठी काय करता येईल? निवृत्तीपश्चात नियोजन वाटते तितके सोपे मुळीच नाही. कमावत्या दिवसांतच आपण आपले आर्थिक नियोजन कसे…