वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी

विवाह हा नवदाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे खर्च करून हा सोहळा जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी संबंधित प्रयत्नशील असतात. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष विवाह ठरल्यानंतर पुढील ४-६ महिन्यांत विवाह समारंभ ठरविला जातो व त्यानुसार विवाह स्थळ, मंगल कार्यालय, हॉटेल किंवा एखादे विशिष्ट स्थळ (डेस्टिनेशन) ठरविले जाते. विवाह समारंभात प्रामुख्याने सोने, कपडे, मंगल कार्यालय/ हॉटेल, जेवणावळी, मेहंदी, व्हिडीओ शूटिंग यावर खर्च होणार असतो व याचे पूर्वनियोजन आणि तयारी केली जाते. अर्थात त्यासाठी आवश्यक ते पेमेंट करावे लागते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेमुळे हा समारंभ पुढे ढकलावा लागतो किंवा रद्द…

*लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा *

*लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा * सध्या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणे ही बाब सोपी झाली आहे.त्याबरोबरच *P2P लेंडिंग * हा प्लॅटफ़ॉर्मसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने कर्जाची रक्कम उपलब्ध करून देत आहे. आणि असाच एक सुंदर प्लॅटफ़ॉर्म प्रूडंट कनेक्ट या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर कंपनीने तयार केला आहे. त्यात ५ दिवस ते ६ महिने किंवा वर्षभरासाठी आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला 8% ते 9.15 % प्रतिवर्ष या दराने परतावा मिळतो. आणि *हा परतावा Assured आहे * यातील सर्व व्यवहार हे online असून परतावा सुद्धा redemation ऑर्डर केल्यावर ४८ तासामध्ये आपल्या बँक खात्यात जमा होतो. आणि या सर्व प्रकियेला “लिक्वीलोन” असे संबोधले जाते. गुंतवणुकीच्या या…

‘लिक्विड फ़ंड’ (लिफ) कसे काम करतात ?

'लिक्विड फ़ंड' (लिफ) कसे काम करतात हे जाणून घेण्याअगोदर लिफ म्हणजे काय, हे समजून घेऊया !! बऱ्याचदा अशी काही परिस्थिती उद्भवते की अचानक काही थोड्या काळासाठी आपल्या बचत खात्यात काही रक्कम येऊन पडते, जिची आपल्याला लगेचच काही गरज नसते, उदा: मनी बॅक पॉलिसीचे पैसे, शेअर्समधील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी विकलेल्या शेअर्सचे पैसे किंवा ऑफिस ने दिलेला प्रोत्साहन भत्ता वगैरे. हे पैसे जर नुसतेच बचत खात्यात राहिले तर 3 ते 4 टक्के व्याज मिळेल. त्यापेक्षा कुठेतरी थोड्या काळासाठी गुंतवले, तर? कारण, अजून सहा महिन्यांनी तुम्हाला नवी बाईक घ्यायची आहे, तेव्हा ते पैसे लागतील, किंवा अजून कशाकरिता… एक गोष्ट आपल्या लक्षात आली…

नांदा सौख्यभरे !!

  गेल्या दोन महिन्यात मला आमच्या नातेवाईकांचे दोन विवाहसोहळे अगदी जवळून पाहता आले. एक विवाह त्रिवेंद्रम येथील होता तर दुसरा मुंबई येथील!! दोन्ही विवाहात एक कॉमन फॅक्टर म्हणजे नवरा व नवरी उच्चशिक्षित आणि आय.टी. किंवा तत्सम क्षेत्रात आपले भविष्य आजमावणा-यापैकी होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्याचा खर्च माझ्या अंदाजाने किमान रु.२५ ते ४० लक्ष च्या घरात असावा. खर्चाचे वर्गीकरण साधारणत: खालीलप्रमाणे दिसते. जेवण- हॉल ८ ते १० लक्ष, कपडे ,पाहुण्याची सरबराईसाठी वाहन वापर, यावरील खर्च ४ ते ५ लक्ष, दागदागिने, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी किमान १० लक्ष !! यामध्ये नवरा नवरीच्या कपड्यासाठी किमान दोन लक्ष तरी खर्च केले जातात. या खरेदीतील कपडे…

SIP मधून पैसे कसे काढायचे?

एसआयपीमधून पैसे काढताना कोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत? पैसे कधी काढले जावे आणि कोणत्या प्रकारचे कर आकारले जाऊ शकतात? हे आज थोडक्यात पाहूया !! रिडेम्पशनपूर्वी लॉक इन पीरियड तपासायला हवा. ELSS मध्ये 3 वर्षांचा लॉक-इन आहे. जर गुंतवणूक एसआयपीद्वारे केली गेली असेल, तर फक्त पहिली एसआयपी ३ वर्षांनी आणि दुसरी तीन वर्ष १ महिन्यानंतर काढता येऊ शकते. जर फंडचा परतावा चांगला सुरू असेल तर आणि पैशाची तत्काळ गरज नसेल, तर पहिल्या एसआयपीपासून ४ वर्षांनी एकरकमी पैसे काढले जावेत. काही फंडांना ठराविक वेळेपूर्वी रिडीम केल्यास १% किंवा त्याहून अधिक एक्झिट लोड शुल्क भरावे लागते. इक्विटी फंडांच्या बाबतीत, वेळ फ्रेम सहसा एक…

NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना

NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना गेल्या दोन वर्षातील कोरोना कालावधीतील “वर्क फ्रॉम होम” या परिस्तिथीमुळे *आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक नियोजन * यांमध्ये लोकांच्या विचारसरणीमध्ये बराच फरक पडलेला जाणऊन येत आहे. “वर्क फॉर्म होममुळे” मेट्रो सिटीमध्ये अनेकजण आपल्या क वर्ग किवा ब वर्ग शहरातील घरातून काम करत आहे. मुलांची शाळा, कॉलेज हे सुद्धा घरातून चालू होते . आणि दुर्दैवाने कुटुंबातील एखादा सदस्य विलगीकरणात राहावयाचा झाल्यास या सर्वांना आपल्या घरातील स्पेसचे नियोजन करणे थोडेफार कठिण झाले होते . या नियोजनाबरोबर आरोग्य विम्याचे महत्त्व अधोरेखित झालेले जाणवत आहे. आणि नव्याने नोकरीतील तरुण असो किंवा आयुष्याच्या पन्नाशीला झुकलेली मंडळी असो या सर्वांनाच आपल्या निवृत्ती नंतरच्या…

शिक्षणाचे महत्व

शिक्षणाचे महत्व मुलांचे शिक्षण ही आपल्या आयुष्यतील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आपल्या मुलांना जगातील उत्तम शिक्षण संस्थामध्ये शिकवायचे असेल तर आजपासून बचत आणि गुंतवणूक करा आणि किमान आपल्या लहान लेकरासाठी तरी अर्थसाक्षर व्हा ! यापूर्वी या गोष्टी डेडीकेटेड शिक्षकांच्या भरवशावर होत असत. पण सध्या अशी शक्यता कमी होत चाललेली आहे. आणखी काही वर्षांनी केवळ पदवीसाठी आपली मुले परदेशी जाणे अपरिहार्य होईल आणि त्यासाठी किमान २५ ते ५० लक्ष खर्च येणार आहे. दर्जेदार शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीने वर नमूद केलेली रक्कम जमा करण्यासाठी सर्व सामान्य नोकरदार किंवा व्यावसायिक १५ वर्षे SIP करून आपल्या मुलाला उच्चशिक्षित करू शकतो. मात्र त्यासाठी खालील आर्थिक…

फक्त १०००० दरमहा – बना कोट्याधीश —

शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असतानाही गुंतवणुकदारांमध्ये म्युच्युअल फंडची मोठी क्रेझ आहे. SIP द्वारे रिटेल गुंतवणुकदार म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक करतान दिसत आहेत. मागील महिन्यात एसआयपीद्वारे १३,८५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एसआयपीद्वारे लहान गुंतवणूक करुन मोठे रिटर्न्स मिळवता येतात. दीर्घकाळ गुंतवणूक करुन कोट्यवधींचा फंड जमा करू शकता. म्युच्युअल फंड्सच्या अशा अनेक स्कीम आहेत, ज्यात दीर्घकाळासाठी सरासरी वार्षिक १२ टक्के रिटर्न्स मिळतात. SIP दीर्घकाळासाठी ठेवल्यास कम्पाउंडिंगचा मोठा फायदा होता. जर तुमचं वय २५ वर्ष असेल आणि तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी २० वर्ष इतका ठेवला असेल, तर याचा मोठा फायदा होईल. SIP Calculator नुसार, तुम्ही वयाच्या २५व्या वर्षी दर महिन्याला १० हजार रुपयांची…

निवृत्तजीवनाचे नियोजन–

सेवानिवृत्त जीवनांत १५ वर्षे लोटलेले श्री देशपांडे  यांना सतावणारा मुद्दा काय? तर निवृत्तीपश्चात मिळालेला पैसा त्यांनी एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविला होता. त्यामधून मिळणारी रक्कम स्थिर असली तरी १५ वर्षांपूर्वी पुरेशी वाटणारी रक्कम आता अपुरी पडायला लागली होती. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना खात्री होती की त्यांच्या निवृत्तीपश्चात मिळालेल्या पैशातून ते समाधानाने आयुष्य जगू शकतील. परंतु व्याजदर इतक्या झपाटय़ाने कमी होतील अशी कल्पना नसल्याने त्यांना आता खर्चाचा मेळ घालणे अशक्य झाले होते. देशपांडेयांचे नेमके काय चुकले आणि त्यांच्यासारख्या चुका न व्हाव्यात यासाठी काय करता येईल? निवृत्तीपश्चात नियोजन वाटते तितके सोपे मुळीच नाही. कमावत्या दिवसांतच आपण आपले आर्थिक नियोजन कसे…

आर्थिक स्वातंत्र्य

आर्थिक स्वातंत्र्य ही अशी मानसिक स्थिती आहे जी आपण आपल्या आर्थिक स्थितीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झालो आहोत असे वाटू लागल्यावर तसेच आपण आपल्या मनात वारंवार पैशांच्या बाबतीत विचार करणे थांबवून जीवनाचा मनमुराद आनंद उपभोगू याचा आत्मविश्वास वाटू लागल्यावर अनुभवू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य फक्त नोकरी, व्यवसाय, स्वरोजगारामुळे येणाऱ्या उत्पन्नामुळे मिळत नाही. असे उत्पन्न तुमचे दैनंदिन जीवन जगण्याचे साधन असते परंतु बराचवेळ आपण ही मिळकत सुरु झाल्यावर  आर्थिक स्वतंत्र झालो अशी समज करून घेतो . ही समजूतच मुळी चुकीची आहे. जो पर्यंत आपण अशा मिळकतीवर आपले दैनंदिन जीवन जगणे अवलूंबून ठेवतो तो पर्यंत आपण आर्थिक स्वातंत्र्य पासून दूर असतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैशाचे…

End of content

No more pages to load