राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS)

National Pension Scheme 1) नॅशनल पेन्शन सिस्टीमचे (एनपीएस) खाते कुठे आणि असे उघडता येते? एनपीएसचे खाते राष्ट्रीयीकृत बँका,पोस्ट ऑफिसम एचडीएफसी बँक, कीटक बँक,आयसीआयसीआय बँक,अॅक्सिस बँक यासारख्या मोठ्या खासगी बँक,काव्ही,स्टॉक होल्डिंग कॉपोरेशन या ठिकाणी उघडता येते. या शिवाय एनएसडीएल; तसेच काव्हींच्या संकेतस्थळावर  लॉंग-इन करून ऑनलाईन ई-एनपीएस खाते उघडता येते. २) हे खाते कोणास उघडता येते? हे खाते निवासी; तसेच अनिवासी भारतीयास वय वर्षे १८ ते ७० च्या दरम्यान उघडता येते.तसेच खाते केवळ एकाच्याच नावाने उघडता येते. संयुक्त नावाने उघडता येत नाही. ३) या खात्यातील गुंतवणुकीचे काय फायदे आहेत? ही दीर्घकालीन गुंतवणूक असून, त्यातून सेवानिवृत्ती नियोजन (रिटायरमेंट प्लॅनिंग) करता येते. यातील गुंतवणूक…

निवृत्ती नियोजन का असावे?

निवृत्ती नियोजन का असावे? भारतातील ६०% पेक्षा जास्त लोकांचे रिटायरमेंट प्लानिंग ( निवृत्ती नियोजन ) नसतेच! आपण यापैकी असाल तर लगेचच आमच्याशी संपर्क साधा. कारण.... आज ज्यांचा मासिक खर्च रु. ३५०००/- च्या आसपास आहे त्यांना ३० वर्षानंतर तेवढ्या सुखसोईमध्ये राहायचे असेल तर होणाऱ्या महागाईपायी किमान रु. ९००००/-प्रतिमहा लागू शकतात.औषधोपचारासाठी खर्च जो सध्या साधारण: २००० रु. आहे , असे गृहीत धरले तर १० वर्षाने तो पाचपट होऊ शकतो. यासाठीच आपल्याला आपले निवृत्ती नियोजन आजपासूनच करणे आवश्यक झाले आहे. म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आपल्यला करबचत व निवृत्ती नियोजन हे दोन्ही फायदे देऊ शकतात. त्यासाठी आपण आमच्या कार्यालयाला भेट देऊन समक्ष चर्चा करा…

ओला इलेक्ट्रिक 2024च्या सुरुवातीस आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत

सर्व कंपन्या वेळोवेळी त्यांचे IPO लाँच करतात. त्यामुळे जर तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर लवकरच एक नवीन आयपीओ मार्केटमध्ये उतरणार आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी ओला इलेक्ट्रिक, जी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात खूप लोकप्रिय झाली आहे, आता लवकरच तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देणार आहे. ओला इलेक्ट्रिक पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ च्या सुरुवातीस आपला आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल आणि गोल्डमन सॅक्स यांना गुंतवणूक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यासाठी चर्चा सुरू आहे. इलेक्ट्रिक वाहनांवरील सरकारी सबसिडी पुढील वर्षी संपणार आहे आणि त्यापूर्वी शेअर बाजारावर सूचीबद्ध करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी आयपीओच्या अगोदर काही मोटारसायकली लाँच करणार आहे.…

हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड

भारतातील बहुतेक कुटुंबांकडे सोन्याचे दागिने आहेत. अनेक जण सोन्याला संकट काळातील साथीदार मानतात. परंतु आताची बातमी ज्यांच्या घरात हॉलमार्क नसलेले केडीएम किंवा इतर सोने आहे, त्यांच्यासाठी फार चांगली नाही. घरात पडून असलेले हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड झालं आहे किंवा नवीन दागिन्यांसह त्यांची देवाणघेवाण करण्यासाठीही खटपट करावी लागणार आहे. सरकारच्या हॉलमार्किंग नियमाच्या अंमलबजावणीमुळे हे संकट उद्भवले आहे. सरकारने १ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला आहे. याबरोबरच सोन्याच्या दागिन्यांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) चा लोगो आणि शुद्धता चिन्ह (जसे की 22K किंवा 18K लागू) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवणुकीपासून दिलासा मिळणार…

या कंपन्या होणार बाजारातून डी-लिस्ट, शेअर्सची खरेदी-विक्री ‘बंद’

शेअर बाजारातून सात शेअर्स डिलिस्ट होणार आहेत. डिलिस्टिंग अशी एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे सूचीबद्ध कंपनी शेअर बाजारातून काढून टाकली जाते. त्यानंतर त्या कंपनीचा शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध नसतो. प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, ७ शेअर्स शेअर बाजारातून डिलिस्ट होणार आहेत. पर्ल अपार्टमेंट्स हाऊसिंग फर्म पर्ल अपार्टमेंट्सचे डिलिस्टिंग १७ मे २०२२ रोजी उघडण्यात आले आणि आज म्हणजेच १६ मे २०२३ रोजी पूर्ण होईल. ऑफरनुसार नकुल सेठ अधिग्रहण करत आहेत. डिलिस्टिंगसाठी ४४.०५ रुपयांची ऑफर किंमत निश्चित करण्यात आली असून ऑफरचा आकार ०.२१ कोटी रुपये आहे. अमृत कॉर्प अमृत कॉर्पची डिलिस्टिंग ऑफर ३ जून २०२२ रोजी उघडली आणि २ जून २०२३ रोजी बंद होईल. डिलिस्टिंगसाठी ९४५…

कर्जदारांना मिळणार दिलासा?

पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये होणाऱ्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये (MPC) रेपो दर वाढणार की नाही? हे मे महिन्यात येणारी महागाईची आकडेवारी ठरवेल. एमपीसीच्या मागील बैठकीत दरवाढीला तूर्तास ब्रेक लावला होता, पण त्याआधी रेपो दरात सलग अनेक वेळा वाढ करण्यात आली. मे महिन्यात किरकोळ चलनवाढ ४% जवळपास राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्याजदरात वाढ होण्याची शक्यता नाही. रेपो दरात वाढ झाल्यामुळे बँका सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याज वाढवतात, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात २.५०% वाढ केली असून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रेपो दर ४% होता, जो आता ६.५०% वर आहे. मात्र, आता महागाई…

Mankind फार्मावर आयकर विभागाची छापेमारी

देशांतर्गत बाजारात यशस्वी स्टॉक लिस्टिंगच्या तिसऱ्या दिवशी मॅनकाइंड फार्मा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. करचुकवेगिरीच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने आज देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी मॅनकाइंड फार्माच्या कार्यालयात झडती घेतली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभाग दिल्ली आणि आसपासच्या भागात कंपनीच्या परिसराची झडती घेत असून कागदपत्रांची तपासणी केली जात असताना लोकांचीही चौकशी करत आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये यशस्वीरित्या सूचिबद्ध झाले. कंपनीने अलीकडेच प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँन्च केला होता. मॅनकाइंड फार्मा ही विविध फार्मास्युटिकल्स उत्पादनांची उत्पादक आहे. दरम्यान, दिल्ली कार्यालयात आयकर विभागाच्या छाप्याच्या वृत्ताचा कंपनीच्या शेअर्सवरही परिणाम झाला. आजच्या व्यवहार सत्रात कंपनीचे शेअर्स ५.५% पर्यंत घसरले.

Credit Card बिल भरण्यास उशीर ? विलंब शुल्क नाही लागणार

आजच्या काळात बहुतेक लोक खरेदीसाठी क्रेडिट कार्डाचा वापर करतात. क्रेडिट कार्डाद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेची चिंता न करता पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डेही वापरण्यास सोपी असतात आणि त्याचे अनेक फायदेही असतात. पण लक्षात घ्या की क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची अंतिम तारीख असते, ज्याचे पालन करणे अनिवार्य असते. बिल दिल्यानंतर एका ठराविक तारखेपर्यंत तुम्हाला बिल भरावे लागेल. मात्र, अंतिम मुदत चुकल्यास आपल्याला दंड भरावा लागतो तसेच तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होण्याचा धोका आहे. अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेला भरायला विसरतात. अशा स्थितीत त्यांचा क्रेडिट स्कोर खराब होतो. मात्र, देय तारखेनंतरही तुम्हाला दंडाशिवाय क्रेडिट कार्ड बिल भरण्याची…

वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी

विवाह हा नवदाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे खर्च करून हा सोहळा जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी संबंधित प्रयत्नशील असतात. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष विवाह ठरल्यानंतर पुढील ४-६ महिन्यांत विवाह समारंभ ठरविला जातो व त्यानुसार विवाह स्थळ, मंगल कार्यालय, हॉटेल किंवा एखादे विशिष्ट स्थळ (डेस्टिनेशन) ठरविले जाते. विवाह समारंभात प्रामुख्याने सोने, कपडे, मंगल कार्यालय/ हॉटेल, जेवणावळी, मेहंदी, व्हिडीओ शूटिंग यावर खर्च होणार असतो व याचे पूर्वनियोजन आणि तयारी केली जाते. अर्थात त्यासाठी आवश्यक ते पेमेंट करावे लागते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेमुळे हा समारंभ पुढे ढकलावा लागतो किंवा रद्द…

१२ वी पास मुलगा झाला करोडपती—संकर्ष चंदा

जेव्हा कधी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचा उल्लेख येतो, तेव्हा दिवंगत राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कोचलिया आणि डॉली खन्ना यांच्यासह अनेक बड्या गुंतवणूकदारांची नावे लोकांच्या समोर येतात. पण भारतात अनेक तरुण गुंतवणूकदारांनीसुद्धा शेअर बाजारातून लाखोंनी पैसा कमावला आहे. लोकांना कदाचित तरुण वयातील नवीन गुंतवणूकदारांबद्दल माहिती नसेल. आता या यादीत एका २४ वर्षीय मुलाचे नाव सामील झाले आहे, ज्याने कॉलेजला जाण्याच्या वयात शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारला आणि तो कोट्यधीश झाला. हैदराबाद येथील संकर्ष चंदा (२४) यानं केवळ १७ वर्षांचा असताना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी संकर्षने शेअर मार्केटमधून १०० कोटी रुपये कमावले.…

End of content

No more pages to load